सोहऽशल मिडिया!

आज नवीन व सर्वांचा आवडता विषय मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय.

या ब्लॉगच्या सुरुवातीला एक किस्सा सांगावासा वाटतो तो असा, पहिला ब्लॉग लिहिल्यावर सर्वांनी कौतुक केले कोणी चुका सांगून मला त्या टाळता याव्यात याविषयी सांगितले.पण एकाने मला विचारले की, ” ब्लॉग तर काल्पनिक किंवा कथा याप्रमाणे असतात तू तर तुझ्या वैयक्तिक मतांविषयी लिहितोय”. मी म्हटले की,”ब्लॉग कसे लिहतात ते मला जरी जमले नाही तरी चालेल पण लोकांपर्यंत माझे म्हणणे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय,तो ही जिवंत आणि महत्वाच्या विषयांवर एवढेच.”

या विषयाला असे नाव देण्याचे कारण म्हणजे सोशल मिडिया मानवनिर्मित असूनही आजकाल तो आपल्यालाच सहन होत नसल्याचे माझ्या निदर्शनास आलेय.

सोशल मिडिया ही सुरुवातीला डिजीटल युगातील सर्वात महत्वाची आणि मोठी क्रांती मानली गेली. कारण यामुळेच की काय हजारो किलोमीटर अंतरावर असूनही माणसे एकमेकांना जोडली जाऊ लागली व एकमेकांशी कनेक्ट झाली. त्याचा फायदा असाही झाला की माणसांच्या नवीन ओळखी निर्माण होऊ लागल्या, एकमेकांच्या जीवनशैली,विचार शेअर करता येऊ लागले. यामुळे झाले असे की, लोकांची सोशल मीडियाकडे कूच वाढू लागली व त्याचा वापर वाढू लागला. एकामुळे दुसरा, दुसर्‍यामुळे तिसरा असे अनेक लोक सोशल मिडियाशी जोडले गेले. त्याचा फायदा , आनंद, उपयोग लोक करून घेऊ लागले

आपल्या आवडीनिवडी,  आपले मत मांडण्यासाठी सोशल मिडिया हे माध्यम बनले आणि त्याचा वापर वाढतच गेला. तो सध्या पाहता जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलाय.आणि त्याचा उपभोग, आनंद लोक घेऊ लागले.

पण ते म्हणतात ना की ‘अति तिथे माती ‘ असे काहीसे व्हायला वेळ लागत नाही. सोशल मिडियाचा जसजसा वापर वाढला तसेच त्याचा अतिरेक ही व्हायला लागला आणि माणसाने या सुरूवातीला काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टींचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध लावायला चालू केले. खाजगी जीवनसुद्धा त्याच्याशी जोडले गेले. सुरुवातीला विचारांची देवाणघेवाण करताना आनंदात वाटणाऱ्या माणसांमध्ये मतभेद मांडताना मात्र वैयक्तिक मतभेदांची जागा वादाने घेतली.

कोणीतरी आपल्याला सोशल मिडिया सारख्या काल्पनिक जगात जरी कोणी काही बोलले तरी आपण त्याचा थेट प्रत्यक्ष जीवनात काही परिणाम होणार आहे का?  प्रत्यक्ष जीवनाचा त्याच्याशी किती संबंध आहे? सोशल मिडियावर वादविवाद घालून कोणती गोष्ट साध्य होणार आहे का? ज्या गोष्टींसाठी आपण त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे तसे होते का? कोणत्या गोष्टींना किती महत्व द्यायचे? असे अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले.

सध्या सर्वात जास्त वादाचे कारण ठरणाऱ्या गोष्टी म्हणजे कोणीतरी महान पुरूषांबद्धल, राजकीय व्यक्तींबद्दल तसेच जे महान किंवा मोठे लोक आहेत त्यांच्याबद्दल अपमानास्पद किंवा अपशब्द वापरून पोस्ट टाकणे. पण तसे पाहिले तर त्या एका पोस्टने त्या व्यक्तिंचे महानत्व कमी होणार आहे का? बर जरी आपण त्यातून वाद घातले,दंगल किंवा जाळपोळ घडवून आणल्या तर त्याचा परिणामही आपल्यालाच भोगायचे आहेत? त्यातून काय आणि गोष्टी साध्य होतात? अशा अनेक प्रश्नांबद्दल आपण विचार करतो का?  

जर तसा योग्य विचार केला तर मला नक्कीच वाटते की, आपण अशा पोस्ट किंवा शब्द वापरताना नक्कीच एकदा तरी विचार करू.

ज्या सोशल मिडिया चा वापर सुरुवातीला वैयक्तिक विचारांशी होता तोच पुढेपुढे जाऊन त्याची जागा राजकारण,जातीयवाद,श्रेष्ठत्व यांसारख्या गोष्टींनी घेतली व यातून वाढत गेले ताणतणाव व वाद.

वाद घालणे किंवा एखाद्याला त्रास देणे एवढे सोप्पे होऊन बसले की कोणतीही ओळख न वापरता, कोणतेही नाव वापरून, पाहिजे तसे शब्द वापरता येऊ लागले. त्याचा परिणाम असाही दिसून येतो की मानसिक रोगांचे निर्माण व्हायला वेळ लागला नाही. व ज्याचा फायदा माणसांना व्हावा या हेतूसाठी मानवानेच बनवलेल्या ‘सोशल मिडिया’ ने त्याची जागा माणसासाठीच त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टीची घेतली.

आपण जेवढे सोशल मिडिया च्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलो तेवढेच त्याचे एक विश्व निर्माण होऊ लागले. आपणाशी सोशल मिडियावर बोलणारी व्यक्ती प्रत्यक्ष जीवनात कशी असेल हे माहित नसतानाही आपण त्याची एक काल्पनिक इमेज बनवायला लागलो. त्या माणसाने वापरलेले ठराविक शब्द, त्याने मांडलेल्या काही गोष्टी यावरूनच आपण त्या व्यक्तीबद्दल मत निर्माण करून त्या व्यक्तीविषयी एक काल्पनिक का असेना पण तसेच विश्व निर्माण करू लागलोय. मग ती व्यक्ती प्रत्यक्षदर्शी कशीही असो आपल्याला त्याच्याशी काहीच देणेघेणे नसते.

हल्ली सर्वात जास्त चर्चेचा विषय म्हणजे ‘सोशल मिडिया वापरावा की वापरू नये’ यावर मी माझे मत असे सांगेन की, मी जे मुद्दे मांडलेत ते तुम्हाला पटो किंवा न पटो पण मी तुमच्यापर्यंत सोशल मिडिया मार्फतच पोहोचवलेत एवढे लक्षात घ्या.

सोशल मिडिया विषयीचे माझ्याकडे असलेले सर्व मुद्दे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलाय, अपेक्षा यावर तुम्ही नक्कीच विचार कराल 🙏

Twitter :@DnyaneshwarGk7 

मो.नं  +919921846483

6 thoughts on “सोहऽशल मिडिया!

  1. तुम्ही ट्विटर वर छान लिहिता. ट्विटरच्या तुमच्या खात्यावर अनेक वेळा फिरून गेलो. वर्डप्रेस वर येण्याचं राहून जायचं. आज अगदी ठरवून आलो तुमचे ब्लॉग वाचतोय. सोशल मीडियावरची तुमची मत एकदम बरोबर आहेत,आवडली.
    जसे तुम्ही ट्विटरवर WordPress वर लिहिता तसेच लिहीत रहा. कथा लिहिण्यापेक्षा ही ठाम मत महत्वाचं. .. आवडेल ते लिहा.आणि आम्हा वाचकांना आनंद आणि विचार द्या.
    शुभेच्छा.

    Liked by 1 person

Leave a comment